नागपूर येथे मन्सुरी, पिंजारी, नद्दाफ, पसमांदा समाजाची जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक; समाजाच्या भविष्यावर गंभीर मंथन..
मन्सुरी पिंजारी नदाफ समाजाची नागपूरसह अमरावती येथे विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली आहे… प्रदेशाध्यक्ष आरीफ आली मन्सुरी…
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर फिरोज मन्सुरी..गंगापुर : नागपूर येथील ‘आमनाबी व्हिला’ येथे मन्सुरी, पिंजारी, नद्दाफ पसमांदा समाजाची एक महत्त्वपूर्ण बैठक यशस्वीरित्या संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र मन्सुरी, पिंजारी समाजाचे अध्यक्ष आरीफ अली मन्सुरी हे होते.दरम्यान त्यावेळी नाशिक जिल्ह्याचे मन्सुरी समाजाचे जिल्हाध्यक्ष ऐनोद्दीन मन्सुरी तसेच औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्ष फिरोज मन्सुरी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. दरम्यान या
बैठकीला नागपूर जिल्हाध्यक्ष हाजी हबीब मन्सुरी सचिव फहिम कुरेशी यांच्यासह पिंजारी समाजातील सर्व जबाबदार आणि सक्रिय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच चंद्रपूरहून इरफान शेख ,नझीर कुरेशी,आणि हबीब मन्सुरी, यांच्या गौरवपूर्ण उपस्थितीने बैठकीला आणखी बळ मिळाले. नागपूर जिल्हा मन्सुरी, पिंजारी, नद्दाफ समाजाकडून प्रमुख पाहुण्याचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .. दरम्यान या बैठकीतील मुख्य मुद्दे आणि चर्चा: या बैठकीत समाजाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने खालील प्रमाणे विविध मुद्यांवर गंभीर मंथन झाले.