चिंचोली लिंबाजी येथील सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या राजीनाम्यासाठी उपोषणाला बसणार आहेत
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील चिचोंली लिं येथील वंचित बहुजन समाजातील सामाजीक कार्यकर्ता तातेराव भुजंग यांनी सात जुन पासुन उपोषण करण्याचे टरवले आहेत कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत आहे कारण की पंतप्रधान नरेंद मोदी यांना पंतप्रधानपदाची जिम्मेदारी संभाळता आली नाही. महागाई वाढली. शेतकरी बांधवांना खते महागाई पेट्रोल डिझेल महाग झाल़े गॅस सिलिंडर महाग झाले… सोने महाग आले. खाद्यतेल महाग झाले आहे.शेतकऱ्यांचा मालाला योग्य भाव मिळत नाहीत तरुणांमध्ये रोजगारीचे प्रमाण वाढले आहे भारताची आर्थिक स्थिती खराब झाली आहे… २०१४ लोकसभा निवडणुकीच्या टाईमाला नरेंद्र मोदीजी साहेब यांनी नागरिकांना आश्वासन देण्यात आले होते की प्रत्येक नागरिकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू. पण अदयापही एक रुपया जमा झाले नाही मोबाईल रिचार्ज २८ दिवसाचा महिना केला शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्या कारणाने आत्महत्याचे प्रमाण वाढले. शेतकर्याच्या मालाला भाव नाही. आमदार, खासदार यांचा पगार पेन्शन बंद करावी असा अनेक समस्या आहे… त्यामुळे नरेंद्र मोदी साहेब देशाची जिम्मेदारी सांभाळता आली नाही असे दिसून येत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन… नविन अभ्यास व्यक्तीमत्वला चान्स द्यावा… जर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी ३० में २०२६ पर्यंत राजीनामा न दिल्यास चिंचोली लिंबाजी येथे ७ जुन रोजी ठिक – सकाळी १०:०० वाजता मी बेमुदत अमरण उपोषणाला बसणार आहेत कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी स्थळ खंडोबा मंदीराच्या पटांगणात (पत्राच्या शेडमध्ये मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग आमरण उपोषणाला बसेल यांची प्रशासनाला कळविण्यात आले आहेत.
