शिवना,- टाकळी प्रकल्पातील पाण्याची नासधुस करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणे बाबत
कन्नड – शिवना,-टाकळी मध्यम प्रकल्पात सध्या स्थित असलेल्या जलसाठ्यातून प्रकल्पाच्या कालव्याची दुरुस्ती न करता सोडलेले पाणी वाया गेल्यामुळे संबंधित कर्मचारी वर्गावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी.अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी वर्गाने केली आहे.
शिवना टाकळी मध्यम प्रकल्पांतर्गत येणाऱ्या परिसरातील शेतकरी वर्गाने एका निवेदणाद्वारे उन्हाळ्यात पिकांना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाकडे मागणी केली होती.परंतु प्रकल्पावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्री वर्गाने पाण्याची मागणी केलेल्या शेतकरी वर्गाच्या बंधाऱ्याची दुरुस्ती न करता गेल्या एक महिन्यापासून त्या नादुरुस्त कालव्यात पाणी सोडले. परंतु बंधाऱ्याची दुरुस्ती न झाल्यामुळे सोडलेल्या पाण्यातून 80% टक्के पाणी हे शेतकऱ्यांच्या पिकांना न मिळता इतरत्रच वाहून गेले आहे.