Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादपुण्यातील वाहतूक कोंडीवर योग्य उपाययोजनांची गरज-डॉ.हुलगेश चलवादी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम...

पुण्यातील वाहतूक कोंडीवर योग्य उपाययोजनांची गरज-डॉ.हुलगेश चलवादी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करा; बसपचे आवाहन

पुण्यातील वाहतूक कोंडीवर योग्य उपाययोजनांची गरज-डॉ.हुलगेश चलवादी
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करा; बसपचे आवाहन


पुणे:- दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक, त्यातून निर्माण होणारी कोंडी पुणेकरांसाठी गंभीर समस्या बनली आहे. ‘टॉमटॉम ट्रॅफिक इन्डेक्स-२०२४’ च्या अहवालानुसार पुण्यात १० किमीचा प्रवास करण्यासाठी सरासरी ३३ मिनिटे २२ सेकंद लागतात. अशा ५०० शहरांच्या यादीत पुणे चौथ्या क्रमांकावर आहे. पुण्यातील ट्रॅफिक गती बहुतांश शहरांपेक्षा बरीच कमी असून पुणेकर दरवर्षी जवळपास १०८ तास फक्त ट्रॅफिक मध्ये घालवतात,असे अभ्यासातून समोर आले आहे. ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. वाहतूक कोंडीचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाने दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे, असे मत बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी बुधवारी (ता.२०) व्यक्त केले.

वाहतूक कोंडीमुळे गैरसोय तर होते, शिवाय याचे थेट परिणाम अर्थव्यवस्थेसह आरोग्य, नागरिकांच्या मानसिक ताणावर होतो. मुख्य मार्गांवर योग्य वाहतूक सिग्नल व्यवस्था, अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण तसेच वर्दळीच्या ठिकाणी जड वाहनांवर बंदी घालण्यासारख्या उपाययोजना तातडीने राबवणे आवश्यक असल्याचे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.

सार्वजनिक वाहतूक सक्षम केल्याशिवाय वाहतूक कोंडी कमी होणार नाही. पीएमपीएमएल बसेसची संख्या वाढवून वाहतुकीवरील ओझं कमी होईल, याची हमी दिली पाहिजे. मेट्रो व बसेसचा लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मजबूत करणे, कारपूलिंग व कंपनी शटल्स ला प्रोत्साहित केले पाहिजे. तसेच सायकल व पादचारी मार्ग उभारावे लागतील, अशी भूमिका डॉ.चलवादी यांनी मांडली.

वाहतूक कोंडीवर स्थायी तोडगा निघावा यासाठी फ्लायओव्हर्स, अंडरपास, मल्टी-लेव्हल पार्किंग हब्स, तसेच रिंग रोड व मेट्रो विस्तार प्रकल्प वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. राज्य सरकारचे २०२६ पर्यंत पुण्यातील सरासरी वाहनगती ३० किमी प्रतितास करण्याचे उद्दिष्ट स्वागतार्ह आहे. मात्र १.३ लाख कोटींच्या मोबिलिटी योजनेत पारदर्शकता आणि काटेकोर अंमलबजावणी गरजेची आहे, असे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.वाहतूक नियमांचे पालन, लेन डिसिप्लिन, ‘नो हॉर्निंग’ मोहीम आणि शाळा-कार्यालयांना फ्लेक्सिबल टाइमिंग्स देणे यामुळे कोंडी लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकते,असे देखील डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.

Previous article
Next article
आशिया करंडकासाठी संतुलित संघ निवड पुढील महिन्यात ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत दुबई येथे टी २० सामन्यांची आशिया करंडक स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी १९ तारखेला १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. आशिया करंडक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज सूर्यकुमार यादव हा करेल तर कसोटीतील भारतीय संघाचा युवा कर्णधार शुभमन गिल हा या संघाचा उपकर्णधार आहे. या भारतीय संघाच्या डावाची सुरुवात संजू सॅमसन व युवा अभिषेक शर्मा हे करतील. संजू अनुभवी तर अभिषेक युवा खेळाडू आहे. संजू आणि अभिषेक हे भारताचे अनुभवी आणि युवा खेळाडू भारताच्या डावाची धडेकबाज सुरवात करतील यात शंका नाही. यांच्यासोबत तिसरा सलामीवीर म्हणून शुभमन गिलची निवड करण्यात आलेली आहे. शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावरही खेळू शकतो. मधल्या फळीची जबाबदारी कर्णधार सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि रिंकू सिंग यांच्यावर आहे. संजू सॅमसन हा सलामीवर यष्टिरक्षणही करेल. तो भारताच्या पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक आहे. जितेश शर्मा याची अतिरिक्त यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तो उत्तम फिनिशर म्हणूनही आपली जबाबदारी पाडू शकेल. भारताची फलंदाजी अतिशय बलवान असून संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल हे पहिल्या तीन क्रमांकाचे फलंदाज जगातील सर्वोत्तम फलंदाज मानले जातात. टी २० सामन्यात या तिघांची कामगिरी उत्तम असून तिघेही टी २० सामन्यातील श्रेष्ठ फलंदाज समजले जातात. स्थानिक क्रिकेट असो की आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट या तिघांची कामगिरी त्यांच्या लैकिकास साजेशी झालेली आहे त्यामुळे त्यांच्या निवडीवर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. त्यांची निवड भारतासाठी सुचिन्ह आहे त्यांनी जर चांगली सुरुवात केली तर भारताचे निम्मे काम फत्ते होईल. टी २० सामन्यात धडाकेबाज सुरुवात होणे महत्वाची आहे आणि हे तिघेही धडाकेबाज खेळीसाठी प्रसिद्ध आहे. चौथ्या क्रमांकावर युवा तिलक वर्मा येईल तो भारताचा भरवशाचा फलंदाज असून मिळालेल्या संधीचे सोने कसे करायचे हे त्याला चांगले ठाऊक आहे. तो फ्लॉप गेला तर त्याची जागा रिंकू सिंग घेईल. तो मैदानात सर्वत्र फटकेबाजी करू शकतो. तोही भारताचा भरवशाचा फलंदाज मानला जातो. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव हा धडाकेबाज फलंदाज मैदानात येईल. तो स्फोटक फलंदाज असून मॅच फिनिशर आहेत. कमी चेंडूत जास्त धावा काढून संघाला विजय मिळवून देण्यात त्याचा हातखंडा आहे. त्यानंतर हार्दिक पांड्या हा जगातील सध्याचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू येईल. तो गोलंदाजी, तडाखेबंद फलंदाजी आणि प्रभावी क्षेत्ररक्षण करून संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावतो. त्याने आपल्या अष्टपैलू खेळीने भारताला अनेक विजय मिळवून दिले आहेत. शिवम दुबे हा आणखी एक अष्टपैलू खेळाडू भारतीय संघात आहे. मध्यमगती गोलंदाजी आणि तडाखेबंद फलंदाजी हे त्याचे वैशिष्ट्ये आहे. गोलंदाजीमध्ये निवड समितीने तीन फिरकी गोलंदाजांना संधी दिली असून अनुभवी अक्षर पटेल सोबत फॉर्मात असलेला चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि ऑफ स्पिनर वरुण चक्रवर्ती यांना संधी मिळाली आहे. कुलदीप आणि अक्षर दोघेही डावखुरे मंदगती गोलंदाज आहेत मात्र त्यांच्यात विविधता आहे. अक्षर पटेल अर्थोडॉक्स स्पिनर आहे तर कुलदीप चायनमन गोलंदाज आहे त्यामुळे जरी ते डावखुरे असले तरी त्यांच्यात विविधता आहे. आणि दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहे अक्षर पटेल हा भारताचा सर्वोत्तम मंदगती गोलंदाज आहे शिवाय तो फलंदाजीही करतो आणि चांगला क्षेत्ररक्षक आहे म्हणजे तो एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. वरुण चक्रवर्ती हा मिस्ट्री गोलंदाज भारतीय संघात आहे. त्यांची ऑफस्पिन भल्या भल्या फलंदाजाला बुचकळ्यात टाकते. तो जबरदस्त फॉर्मात आहे. भारताला चॅम्पियन ट्रॉफी जिंकून देण्यात त्याचे मोलाचे योगदान होते. आताही त्याने तसेच योगदान दिले तर भारत आशिया करंडकावर पुन्हा एकदा नाव कोरू शकतो. जसप्रीत बुमराह व अर्शदीप सिंग या अनुभवी वेगवान गोलंदाजांसोबत हर्षित राणा या युवा गोलंदाजाला देखील निवड समितीने संधी दिली आहे. निवड समितीने अर्शदीप सिंग या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला संधी देऊन वेगवान गोलंदाजीत विविधता आणण्याचा प्रयत्न केला आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचे महत्व अनन्यसाधारण आहे. २०११ साली झहीर खान या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने अप्रतिम कामगिरी करून भारताला विश्वचषक मिळवून दिला होता इतकेच नाही तर मागील वर्षी भारताने जिंकलेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत अर्शदीप सिंगनेच सर्वाधिक बळी मिळवले होते. डावाच्या शेवटी म्हणजे डेथ ओव्हरमध्ये अर्शदिप सिंगची गोलंदाजी प्रभावी ठरते. निवड समितीने निवडलेला हा संघ चांगला आहे. जुन्या आणि नव्या खेळाडूंना संधी देत जोश आणि होश यांचे संतुलन साधण्याचा प्रयत्न निवड समितीने केला आहे त्यात ते बऱ्यापैकी यशस्वीही ठरले आहेत. श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल आणि मोहम्मद सिराज या अनुभवी खेळाडूंची निवड न झाल्याचे दुःखही आहे मात्र निवड समिती फक्त पंधरा सदस्यांचा संघ निवडू शकते त्यामुळे इच्छा असूनही निवड समितीला या खेळाडूंना या संघात निवडता आले नसेल मात्र भविष्यात त्यांना नक्की संधी मिळेल त्यामुळे त्यांनी नाउमेद होऊ नये. आशिया करंडकासाठी निवडण्यात आलेला हा संघ संतुलित आहे हे मान्य करून नीवड समितीचे याबाबत अभिनंदन करावे लागेल. आता जबाबदारी आहे ती निवडण्यात आलेल्या या १५ खेळाडूंची. या १५ खेळाडूंनी आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून आशिया करंडकावर पुन्हा भारताचे कोरावे. आशिया करंडकावर भारताचे नाव कोरण्यासाठी हे खेळाडू जीवाचे रान करतील आणि १४५ कोटी भारतीयांना आशिया करंडक जिंकून देतील यात शंका नाही. या स्पर्धेसाठी निवड झालेले सर्व खेळाडू अनुभवी आहेत. टी २० सामने खेळण्याचा सर्वांना मोठा अनुभव आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही स्पर्धा दुबईत होणार आहे. संघात निवड झालेल्या सर्व खेळाडूंना दुबईत खेळण्याचा चांगला अनुभव आहे त्यामुळे देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करून भारताला पुन्हा एकदा आशिया करंडक जिंकून देण्याची जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतील अशी आशा करूया. भारतीय संघाला टी २० आशिया करंडक स्पर्धेसाठी मनापासून शुभेच्छा! श्याम ठाणेदार
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments