हिरापूर थापटी परिसरात झालेले आंदोलन कश्यासाठी
अवैध धंदे बंद करण्यासाठी की पुढाऱ्यांना हप्ते चालू करण्यासाठी
आत्ताच एक्सप्रेस
संभाजीनगर/प्रतिनिधी/ पैठण तालुक्यातील दिनांक सहा पासून दिनांक सवीस पर्यंत वीस दिवस चाललेला मुद्दा म्हणजे हिरापूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेले कुलस्वामिनी कलाकेंद्र थापटी तांडा हिरापूर, देवगाव, ब्राम्हणगाव, रजापूर,आडुळ, कडेठाण,गेवराई,आंतरवली,दाभरूळ अदी सर्व गावांनी केलेले आंदोलन.
सविस्तर माहिती अशी की आपल्या संपूर्ण गावाने आणि परिसरातील सर्व नागरिकांनी कुलस्वामिनी कलाकेंद्र बंद व्हावे म्हणून खूप मोठं आंदोलन केलेले सर्वांनाच कळतं.. चालू असलेले हे कलाकेंद्र अवैध आहे असं गावकरी म्हणतात. कलाकेंद्र बंद या साठी आंदोलन झाले पण, सुखी संसाराला आग लावणाऱ्या अवैध धंदे देशी, विदेशी दारू, चक्री, मटका बंद व्हावे. या साठी कुणी शब्द पण नाही काढला. पण गाव तर बंद करण्यासाठी तयार आहे पण दहा ते पंधरा गावातील जे सरपंच आणि सर्व पुढारी आहेत हे नेमकं काय करत आहे कारण यांनी जर ठरवले तर अशक्य काहीच नाही हे बंद होऊ शकते. पण अस आढळले आहे. की काही सरपंच सह काही नेते पुढारी तिथं नाचून आलेले आहेत आणि काही जणांनी तिथून मालकाकडून पैसे घेऊन त्यांना सांगितले की आम्ही फक्त आंदोलन करू आणि तुमचे कला केंद्र बंद होऊन देणार नाही आम्हाला ग्रामपंचायतला हप्ते चालू करून द्या. त्यामुळे मला असे सांगायचे आहे की सामान्य गावकऱ्यांना वाटते की कला केंद्र बंद होईल. पण हे काही बंद होणार नाही. कारण की या नेते, पुढार्यांना पैसे कमवायचे आहे. कला केंद्राच्या आडून आणि ही सामान्य जनता यामधून भरकटली जात आहे तर एक सांगायचे जी कला केंद्रातील कलाकार काम करतात त्यांचा देखील प्रश्न निर्माण होतो. की त्यांनी कुठे काम करावे त्यांनी त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न कुठे भागवावा यांचा प्रश्न कोण सोडवेल त्यांना सुद्धा पोट पाणी आहे फक्त त्यांनी वाईट काम करू नये एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि जर असे झाले तर आंदोलन करून काही फायदा होणार नाही.त्यामुळे फक्त पुढार्यांचा फायदा होईल आणि हद्दीतील जे ग्रामसेवक ग्रामपंचायत सरपंच आहेत त्यांचा पुरेपूर फायदा होईल आणि सामान्य गावकऱ्यांना वाटेल की सरपंचांनी आपल्याला खूप मदत केली पण याच्यातून काहीही साध्य होणार नाही आणि याच्यातून फक्त आणि फक्त काही पुढारी लोकांचा लाभ होणार आहे, जर नेते पुढारी यांचा लाभ होणार असेल तर हे कला केंद्र बंद का करायचे तर या कला केंद्रावर काम करणाऱ्या मजूर कामगारांचा रोजगार का बुडवायचा ?