Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादऔरंगजेब कबरीचा वाद शांत होताच,भेट देण्यासाठी पर्यटक तसेच भाविकांची रांगा

औरंगजेब कबरीचा वाद शांत होताच,भेट देण्यासाठी पर्यटक तसेच भाविकांची रांगा

औरंगजेब कबरीचा वाद शांत होताच,भेट देण्यासाठी पर्यटक तसेच भाविकांची रांगा
-औरंगजेब कबरीच्या मुद्द्यामुळे देशभरात वातावरण तापले होते.
-पर्यटक व भाविकांची खुलताबादकडे पाठ फिरवले होते
– खुलताबाद येथे व्यवसायिकां च्या धंद्यांवर परिणाम झाले होते

खुलताबाद प्रतिनिधी खुलताबाद येथील औरंगजेब कबरीच्या मुद्द्यामुळे देशभर वातावरण चांगलेच  तापले होते भाविक व पर्यटक खबरदारीचा उपाय म्हणून खुलताबाद परिसरातील पर्यटन व धार्मिक स्थळांकडे येण्याचे टाळत होते खुलताबाद शहरासह परिसरातील व्यवसायांवर मोठा परिणाम झाले होते. खुलताबाद शहरात औरंगजेबच्या कबरीवर वाद शांत झाल्याने ईद व बासीईद निमित्त या दोन दिवसात देशभरातील तब्बल   पाच हजार पर्यटक व भाविकांनी औरंगजेब कबरीला भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादामुळे पर्यटकांची संख्या घटली होती,मात्र वातावरण शांत झाल्याने भाविक व पर्यटनच्या मोठ्या संख्यांनी गर्दी होताना दिसत आहे.. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे पोलिस प्रशासन सतर्क झाले असून,सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत. प्रवेशासाठी आधार कार्डची पडताळणी केली जात आहे,तसेच भाविक व पर्यटकांना मोबाईल बाहेर ठेवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
ईद व बासी ईदच्या निमित्ताने खुलताबाद शहरात आलेल्या भाविकांमुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला असून,स्थानिक प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. खुलताबाद व परिसरातील व्यावसायिकांनाही याचा मोठा फायदा होत आहे.
गेल्या काही दिवसा पासून देशभरात औरंगजेबच्या कबरीवर विविध कारणांमुळे वादंग निर्माण झाले होते,मात्र सध्या परिस्थिती शांतता झाल्याने पूर्वपदावर येत असून,भाविक व पर्यटकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments