Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादसंस्कृत भाषा ही अतिशय समृध्द भाषा आहे 

संस्कृत भाषा ही अतिशय समृध्द भाषा आहे 

संस्कृत भाषा ही अतिशय समृध्द भाषा आहे 

संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. संस्कृत भाषेमध्ये प्रचंड शब्द संग्रह असून संस्कृत भाषेमधील सुभाषितांमुळे संस्कृत भाषा ही अतिशय समृध्द भाषा झाली असून विचाराने समृध्द बनवणारी भाषा आहे असे प्रतिपादन श्रीराम संस्कृत विद्यालय (पाठशाळा),ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालय,व अखिल भारतीय शालिवाहन संस्कृत प्रतिष्ठान,जालना यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत दिनानिमित्ताने दिनांक -१९/०८/२०२५ रोजी आयोजित संस्कृत दिन व शालेय संस्कृत स्पर्धे परितोषिक वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्रसंगी जालना येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता प्रमोद कुमावत यांनी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) विष्णु पाचफुले,संस्कृत भारतीचे क्षेत्रिय संघटन मंत्री संजीवकुमार,अंबड येथील उद्योजक व युवा सामाजिक कार्यकर्ते इजि.दीपक भोरे, संस्कृत भाषा प्रचार समितीचे अध्यक्ष हरेश शेलगांवकर, उपाध्यक्षा जयश्री कुलकर्णी,श्रीराम वाचनालयाचे सचिव श्रीकांत शेलगांवकर यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करणात आली. प्रास्ताविक शाम शेलगावकर यांनी केले.
मनोगत व्यक्त करतांना प्रमोद कुमावत म्हणाले कि, संस्कृत भाषेला सध्या चांगले दिवस आहे कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०  मध्ये संस्कृत भाषेला स्थान दिले आहे. संस्कृत भाषेने जगाला वैश्विक विचार दिला. श्रीराम वाचनालयातील दुर्मीळ ग्रंथाचे वाचन सर्वांनी करावे. संस्कृत भाषेमध्ये संस्कार असल्यामुळे संस्कृत भाषा ही सर्वांनी शिकावी. पालक विद्यार्थ्यांकडून संस्कृतचे श्लोक,स्तोत्र पाठांतर करुन घेता त्याबद्दल त्यांनी पालकांचे कोतूक केले. विचाराने समृध्द संस्कृत भाषेने केले आहे. आज वैचारिक दिवाळखोरी झाली आहे. विचाराने समृध्द व्हायच असेल तर वाचन आवश्यक आहे. संस्कृत भाषा विचाराने समृध्द बनवणारी भाषा आहे. संस्कृत भाषेत प्रचंड ज्ञान भंडार आहे.
विष्णु पाचफुले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले कि, श्रीराम संस्कृत विद्यालय व श्रीराम वाचनालय या दोन संस्था मी लहानपणापासून पाहत आहे. विद्यालयात शिकून काही विद्यार्थी मोठे झाले. व्यक्तिला वाचन करणे आवश्यक आहे. संस्कृतचा व वाचन चळवळीचा प्रचार-प्रसार होत असल्यामुळे श्रीराम संस्कृत विद्यालय व श्रीराम वाचनालय या संस्था जालना शहारासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
दीपक भोरे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले कि, विद्यार्थीनी मोबाईलचा वापर कमी करावा व अभ्यासाकडे लक्ष द्यावे. संस्कृत भाषेमध्ये एका शब्दास अनेक समानर्थी शब्द आहे. संस्कृत भाषेमध्ये शब्दाचा क्रम बदलल्यास अर्थ बदलत नाही. संस्कृत भाषा ही स्पष्ट भाषा असून ती शिकण्यास सोपी आहे. जर्मनील १४ विद्यापीठात संस्कृत भाषा शिकवले जाते. विद्यार्थ्यांवर संस्कृत भाषेमुळे संस्कार घडतात. संस्कृत भाषेच्या अध्यनामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल आहे.
यावर्षी संस्कृत स्पर्धेमध्ये ३२८ विद्यार्थांनी सहभाग घेतला त्यापैकी ६६ विद्यार्थांनी प्राविण्य प्राप्त केले. प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थ  विद्यार्थांना प्रमाणपत्र व  पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मिनी कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार जयश्री कुलकर्णी यांनी मानले. याप्रसंगी मनोहर कुलकर्णी,शाहिर बाबुसेवा राठोड, सुधाकर वाहेगांवकर, रामेश्वर खंडागळे, अमित टाकरवनकर,मुकेश मापारी,शैलेंद्र  बदनापूरकर,अश्विनी भाले,रेणुका गुलापेल्ली,अभिजित शेंडगे यासह विद्यार्थी,पालक,संस्कृत शिक्षक,वाचक वर्ग उपस्थित होता.

Previous article
आशिया करंडकासाठी संतुलित संघ निवड पुढील महिन्यात ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत दुबई येथे टी २० सामन्यांची आशिया करंडक स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी १९ तारखेला १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. आशिया करंडक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज सूर्यकुमार यादव हा करेल तर कसोटीतील भारतीय संघाचा युवा कर्णधार शुभमन गिल हा या संघाचा उपकर्णधार आहे. या भारतीय संघाच्या डावाची सुरुवात संजू सॅमसन व युवा अभिषेक शर्मा हे करतील. संजू अनुभवी तर अभिषेक युवा खेळाडू आहे. संजू आणि अभिषेक हे भारताचे अनुभवी आणि युवा खेळाडू भारताच्या डावाची धडेकबाज सुरवात करतील यात शंका नाही. यांच्यासोबत तिसरा सलामीवीर म्हणून शुभमन गिलची निवड करण्यात आलेली आहे. शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावरही खेळू शकतो. मधल्या फळीची जबाबदारी कर्णधार सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि रिंकू सिंग यांच्यावर आहे. संजू सॅमसन हा सलामीवर यष्टिरक्षणही करेल. तो भारताच्या पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक आहे. जितेश शर्मा याची अतिरिक्त यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तो उत्तम फिनिशर म्हणूनही आपली जबाबदारी पाडू शकेल. भारताची फलंदाजी अतिशय बलवान असून संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल हे पहिल्या तीन क्रमांकाचे फलंदाज जगातील सर्वोत्तम फलंदाज मानले जातात. टी २० सामन्यात या तिघांची कामगिरी उत्तम असून तिघेही टी २० सामन्यातील श्रेष्ठ फलंदाज समजले जातात. स्थानिक क्रिकेट असो की आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट या तिघांची कामगिरी त्यांच्या लैकिकास साजेशी झालेली आहे त्यामुळे त्यांच्या निवडीवर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. त्यांची निवड भारतासाठी सुचिन्ह आहे त्यांनी जर चांगली सुरुवात केली तर भारताचे निम्मे काम फत्ते होईल. टी २० सामन्यात धडाकेबाज सुरुवात होणे महत्वाची आहे आणि हे तिघेही धडाकेबाज खेळीसाठी प्रसिद्ध आहे. चौथ्या क्रमांकावर युवा तिलक वर्मा येईल तो भारताचा भरवशाचा फलंदाज असून मिळालेल्या संधीचे सोने कसे करायचे हे त्याला चांगले ठाऊक आहे. तो फ्लॉप गेला तर त्याची जागा रिंकू सिंग घेईल. तो मैदानात सर्वत्र फटकेबाजी करू शकतो. तोही भारताचा भरवशाचा फलंदाज मानला जातो. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव हा धडाकेबाज फलंदाज मैदानात येईल. तो स्फोटक फलंदाज असून मॅच फिनिशर आहेत. कमी चेंडूत जास्त धावा काढून संघाला विजय मिळवून देण्यात त्याचा हातखंडा आहे. त्यानंतर हार्दिक पांड्या हा जगातील सध्याचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू येईल. तो गोलंदाजी, तडाखेबंद फलंदाजी आणि प्रभावी क्षेत्ररक्षण करून संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावतो. त्याने आपल्या अष्टपैलू खेळीने भारताला अनेक विजय मिळवून दिले आहेत. शिवम दुबे हा आणखी एक अष्टपैलू खेळाडू भारतीय संघात आहे. मध्यमगती गोलंदाजी आणि तडाखेबंद फलंदाजी हे त्याचे वैशिष्ट्ये आहे. गोलंदाजीमध्ये निवड समितीने तीन फिरकी गोलंदाजांना संधी दिली असून अनुभवी अक्षर पटेल सोबत फॉर्मात असलेला चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि ऑफ स्पिनर वरुण चक्रवर्ती यांना संधी मिळाली आहे. कुलदीप आणि अक्षर दोघेही डावखुरे मंदगती गोलंदाज आहेत मात्र त्यांच्यात विविधता आहे. अक्षर पटेल अर्थोडॉक्स स्पिनर आहे तर कुलदीप चायनमन गोलंदाज आहे त्यामुळे जरी ते डावखुरे असले तरी त्यांच्यात विविधता आहे. आणि दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहे अक्षर पटेल हा भारताचा सर्वोत्तम मंदगती गोलंदाज आहे शिवाय तो फलंदाजीही करतो आणि चांगला क्षेत्ररक्षक आहे म्हणजे तो एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. वरुण चक्रवर्ती हा मिस्ट्री गोलंदाज भारतीय संघात आहे. त्यांची ऑफस्पिन भल्या भल्या फलंदाजाला बुचकळ्यात टाकते. तो जबरदस्त फॉर्मात आहे. भारताला चॅम्पियन ट्रॉफी जिंकून देण्यात त्याचे मोलाचे योगदान होते. आताही त्याने तसेच योगदान दिले तर भारत आशिया करंडकावर पुन्हा एकदा नाव कोरू शकतो. जसप्रीत बुमराह व अर्शदीप सिंग या अनुभवी वेगवान गोलंदाजांसोबत हर्षित राणा या युवा गोलंदाजाला देखील निवड समितीने संधी दिली आहे. निवड समितीने अर्शदीप सिंग या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला संधी देऊन वेगवान गोलंदाजीत विविधता आणण्याचा प्रयत्न केला आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचे महत्व अनन्यसाधारण आहे. २०११ साली झहीर खान या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने अप्रतिम कामगिरी करून भारताला विश्वचषक मिळवून दिला होता इतकेच नाही तर मागील वर्षी भारताने जिंकलेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत अर्शदीप सिंगनेच सर्वाधिक बळी मिळवले होते. डावाच्या शेवटी म्हणजे डेथ ओव्हरमध्ये अर्शदिप सिंगची गोलंदाजी प्रभावी ठरते. निवड समितीने निवडलेला हा संघ चांगला आहे. जुन्या आणि नव्या खेळाडूंना संधी देत जोश आणि होश यांचे संतुलन साधण्याचा प्रयत्न निवड समितीने केला आहे त्यात ते बऱ्यापैकी यशस्वीही ठरले आहेत. श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल आणि मोहम्मद सिराज या अनुभवी खेळाडूंची निवड न झाल्याचे दुःखही आहे मात्र निवड समिती फक्त पंधरा सदस्यांचा संघ निवडू शकते त्यामुळे इच्छा असूनही निवड समितीला या खेळाडूंना या संघात निवडता आले नसेल मात्र भविष्यात त्यांना नक्की संधी मिळेल त्यामुळे त्यांनी नाउमेद होऊ नये. आशिया करंडकासाठी निवडण्यात आलेला हा संघ संतुलित आहे हे मान्य करून नीवड समितीचे याबाबत अभिनंदन करावे लागेल. आता जबाबदारी आहे ती निवडण्यात आलेल्या या १५ खेळाडूंची. या १५ खेळाडूंनी आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून आशिया करंडकावर पुन्हा भारताचे कोरावे. आशिया करंडकावर भारताचे नाव कोरण्यासाठी हे खेळाडू जीवाचे रान करतील आणि १४५ कोटी भारतीयांना आशिया करंडक जिंकून देतील यात शंका नाही. या स्पर्धेसाठी निवड झालेले सर्व खेळाडू अनुभवी आहेत. टी २० सामने खेळण्याचा सर्वांना मोठा अनुभव आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही स्पर्धा दुबईत होणार आहे. संघात निवड झालेल्या सर्व खेळाडूंना दुबईत खेळण्याचा चांगला अनुभव आहे त्यामुळे देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करून भारताला पुन्हा एकदा आशिया करंडक जिंकून देण्याची जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतील अशी आशा करूया. भारतीय संघाला टी २० आशिया करंडक स्पर्धेसाठी मनापासून शुभेच्छा! श्याम ठाणेदार
Next article
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments