६ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिवस
प्रति, माननीय संपादकजी
विषय:-निसर्ग मित्र गिधाड यांची घटती संख्या चिंताजनक.
आंतरराष्ट्रीय गिधाड जागरूकता दिन, ज्याचा उद्देश गिधाडांच्या सर्व प्रजातींबद्दल जागरूकता निर्माण व्हावी व घटती संख्या या उद्देशाने २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील बर्ड्स ऑफ प्रे कार्यक्रम आणि युनायटेड किंग्डममधील हॉक कंझव्हन्सी ट्रस्ट सहकार्याने सुरूवात करतात आली. तेव्हापासुन निसर्ग मित्र गिधाड यांची घटती संख्या पहाता जगात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारला आंतरराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.देशात दिवसेंदिवस सर्वच स्तरातून प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.अत्याधुनिक साधनसामग्री, कारखाने, जंगल तोड, अणुचाचणी, दारूगोळा,वाढती युद्धजन्य परिस्थितीत व वाढते औद्योगिकीकरण यांमुळे आकाश-पाताळ-पुर्व-पश्चिम -उत्तर- दक्षिण-पृथ्वी-निसर्ग पुर्णपणे अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये येवुन ठेपली आहे.यामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रदुषण दिसून येते.याचाच परिणाम आज मानव, पशुपक्षी, जीवजंतू यांना भोगावा लागत आहे.आज वाढत्या प्रदूषणामुळे पक्षांना आकाशात उडतांना अनेक कठीणायीचा सामना करावा लागतो.जंगलतोडीमुळे जंगलातील पशुपक्षांचे जगणे अत्यंत कठीण झाले आहे आणि आता निसर्गाला संतुलित ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते निसर्ग मित्र गिधाड यांनाच आज मृत्यूशी सामना करावा लागत आहे याला अत्यंत भयावह परिस्थिती म्हणावी लागेल. मेलेल्या जनावरांचे मांस खाऊन निसर्गाचे संतुलन सुरक्षित ठेवण्याचे काम मुख्यत्वेकरून गिधाडांचे आहे.त्यामुळे गिधाड आपली भूमिका चोखपणे बजावुन निसर्ग निरोगी ठेवुन पृथ्वीचे,मानवजातीचे व संपूर्ण जीवजंतूचे रक्षण गिधाड करायचे व करीत आहे.परंतु भारतासाठी धक्कादायक बातमी म्हणजे भारतातील 90 टक्के गिधाडांची संख्या घटल्याने भारतीय निसर्गावर मोठे संकट आल्याचे दिसून येते.यासाठी आजच्या परिस्थितीत गिधाडांना वाचवीने काळाची गरज आहे.गिधाडांना मृत्यूच्या खाईत लोटण्याचे काम मानवजातीनेच केले आहे.भारतात ६ भारतीय व ३ स्थलांतरित अशा ९ प्रजातीच्या गिधाडांचे अस्तित्व आहे. १९८० च्या दशकापर्यंत देशात गिधाडांची संख्या ४० दशलक्ष पेक्षा जास्त होती.मात्र डायक्लोफेनॅक सारख्या विषारी औषधांमुळे अवघ्या १५-२० वर्षात ९० टक्के गिधाडे संपली. काही प्रजातीतर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.जनावरांना दिली जाणारी डायक्लोफेनॅक औषध ही गिधाडांच्या मृत्यूचे कारण ठरायला लागली.त्यामुळे सरकारने २००६ मध्ये डायक्लोफेनॅक औषधीवर बंदी घातली.तरीही या औषधीचा वापर होत असल्याने २०१५ मध्ये भारत सरकारने त्यांच्या उत्पादनावर पुर्णतः बंदी घातली.डायक्लोफेनॅकवर बंदी लावली असली तरी इतर नॉन-स्टेरॉइडल ऍंटी-इंफ्लेमेटरी ड्रग्सचा वापर जनावरांवर केला जातो आणि या औषधीचाही वापर गिधाडांसाठी तेवढ्याच धोकादायक आहे.म्हणजेच आपण जनावरांना जेही काही औषधे देतो ती संपूर्ण गिधाडांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे. त्यामुळे मृत जनावरांचे मांस खाऊन निसर्गाचे संतुलन निरोगी ठेवणाऱ्या निसर्ग मित्रालाच आता वाचविण्याची वेळ आली आहे.२५-३० वर्षापुर्वी गिधाड मृत जनावरांचे जे मांस खायचे ते त्यांना पोषक व आहार युक्त होते. परंतु आधुनिक युगात गेल्या काही वर्षांपासून जनावरांना अनेक रोगांपासून वाचविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधे व इंजेक्शन देऊन त्यांचे प्राण वाचवले जाते.काही जनावरांना प्रजननासाठी व दुधाची मात्रा वाढवीण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषधांचा व इंजेक्शनचा वापर होतांना दिसतो व होत आहे.परंतु यांचा विपरीत परिणाम निसर्ग संरक्षक गिधाड याला भोगावा लागत आहे.कारण जी औषधे जनावरांना देण्यात येते ती औषधे जनावरे मृतपावल्यानंतर विषेली होतात.ही मृत जनावरे गिधाड खातात व त्यांना अनेक रोगांच्या यातना भोगुन मृत्यूशी झुंज द्यावी लागते.यामुळेच आज निसर्ग मित्र गिधाड यांची संख्या ९० टक्याने घटल्याचे दिसून येते.ही अत्यंत चिंतेची आणि गंभीर बाब आहे.एका माहितीनुसार १९९३ ते २००७ दरम्यान भारतीय प्रजाती असलेल्या पांढऱ्या पुठ्याचे गिधाडांची संख्या ९९.९ टक्के नष्ट झाली आहे.याशिवाय भारतीय गिधाड व निमुळत्या चोचीचे गिधाड या प्रजातींची ९९ टक्के संख्या कमी झाली आहे. म्हणजेच निसर्ग सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने गिधाडांची संख्या कमी होने अत्यंत चिंताजनक बाब आहे.त्यामुळे गिधाडांच्या बहुतेक प्रजाती नामशेष होण्याची भीती पहाता; भारतीय निसर्ग मित्राला वाचविण्याची काळाची गरज आहे.२०२० ते २०२५ पर्यंतच्या भारतातील गिधाड संवर्धनाच्या कृती आराखड्यानुसार भारतीय गिधाड फाउंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्र वनविभाग गिधाड संवर्धन प्रजनन केंद्रे स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.ही अत्यंत आनंदाची बाब आहे याचे मी स्वागत करतो.आंतराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिनाचे औचित्य साधून निसर्ग मित्र गिधाड यांना वाचविण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेच सोबतच संपूर्ण राज्य सरकार व केंद्र शासीत प्रदेशातील वनविभागाने गिधाडांना वाचवीन्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे.यामुळे निसर्ग प्रफुल्लित रहाण्यास मोठी मदत होईल व सोबतच प्रदूषणावर सुध्दा मात करण्यास आपल्याला यश प्राप्त होईल.जंगल सुरक्षित तर निसर्ग सुरक्षित,निसर्ग सुरक्षित तर पशुपक्षी सुरक्षित, पशुपक्षी सुरक्षित तर आपण सुरक्षित ही बाब सर्वांनीच लक्षात ठेवली पाहिजे.कारण मानव हा बुध्दीजीवी प्राणी आहे.त्यामुळे निसर्ग मित्र गिधाड यांना वाचविण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न व्हायला हवेत.
–रमेश कृष्णराव लांजेवार
